महेश मांजरेकर यांना दिलेल्या एका मुलाखतीमध्ये मनसेप्रमुख राज ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती संदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता, या प्रश्नाला उत्तर देताना राज ठाकरे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. “कुठल्याही मोठ्या गोष्टी, आमच्यातले वाद, आमची भांडणं किरकोळ आहेत. महाराष्ट्र खूप मोठा आहे. महाराष्ट्राच्या अस्तित्त्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्त्वासाठी ही भांडणं, वाद अत्यंत क्षुल्लक गोष्टी आहेत. एकत्र येणं, एकत्र राहणं या फार कठीण गोष्टी आहेत, असं मला वाटत नाही,” असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. तर राज ठाकरे यांच्या या भूमिकेचं शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील स्वागत केलं आहे. मी किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला तयार आहे. सर्व मराठी माणसांच्या हितासाठी मी एकत्र यायला तयार आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.