नवी दिल्ली सरकारी नोकऱ्यांसाठी सध्या कमालीची स्पर्धा आहे. चांगले शिक्षण घेतले असले तरी खासगी क्षेत्रातही चांगल्या पगारासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. अशा स्थितीत युवकांना रोजगार करून आर्थिक प्रगती साधता यावी, यासाठी केंद्र सरकारकडून अनेक सुविधा पुरविल्या जातात. शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातील तरुणही यात मागे राहू नयेत यासाठी सरकारने शेतकऱ्यांसाठीही अनेक योजना सुरू केल्या आहेत. शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी सरकारने कृषी पायाभूत निधी (एआयएफ) ही योजना सुरू केली आहे. यातून शेतीसंबंधित पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी अर्थसाह्य केले जाते. शेतीशी संबंधित उद्योग करावयाचा असेल तर युवकांना या योजनेतील लाभ मिळू शकतात.
योजनेची वैशिष्ट्ये
- ६% व्याजदराने
- १७ वर्षांसाठी कर्ज
- दोन कोटींपर्यंत विनातारण कर्ज
- ३% पर्यंत व्याज सवलत बँकाकडून ६० दिवसांत कर्ज प्रक्रियेची पूर्तता
>ॲग्री बिझनेस >कृषी प्रक्रिया > शेतीपूरक उद्योगासाठी मिळेल २ कोटींचे कर्ज
शेतीपूरक उद्योगासाठी मिळेल २ कोटींचे कर्ज