कोपरगाव प्रतिनिधी दि. ८ : कोपरगाव चे आमदार आशुतोष काळे हे जनतेच्या नेजरेत फेल ठरलेले आमदार असुन त्यांनी जनतेचा विश्वासघात केला आहे.
कोपरगाव नगरपालीकेचे मुख्याधिकारी व आमदार आशुतोष काळे यांची एकहाती सत्ता होती गेल्या चार वर्षांपासून गल्ली ते दिल्लीत त्यांची सत्ता असुनही ते नागरीकासोबत भुलथापांच राजकारण करुन जनतेच्या नजरेतील फेल आमदार अशी ओळख झाली आहे अशी टिका भाजपचे युवा नेते व सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे यांनी पञकार परिषद घेवून आमदार आशुतोष काळे यांच्या कामकाचाजा समाचार घेतला.
कोल्हे साखर कारखान्याच्या विश्राम गृहावर युवानेते विवेक कोल्हे यांनी कोपरगाव नगरपालीकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या अनुषंगाने पञकार परिषदेचे आयोजन करुन पञकारांशी संवाद साधताना आमदार काळेवर निशाणा साधला या पञकार परिषदेवेळी भाजप चे पदाधिकारी माजी नगराध्यक्ष दिलीप दारुणकर, माजी नगराध्यक्ष राजेंद्र शिंदे, केशवराव भवर , नारायण अग्रवाल, मच्छिंद्र केकाण, शरद थोरात आदींची उपस्थिती होती.यावेळी बोलताना विवेक कोल्हे म्हणाले की, सध्या पालीका निवडणुकीचा धुराळा उडवत असला तरीही गेल्या ४ वर्षात आमदार काळे यांनी केल्या विकास कामातून कोपरगावची साधी धुळ सुध्दा कमी झाली नाही.दडपशाही ,गोळीबार, पोलीसांना मारहाण करीत गुंडगिरीने नागरीकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण केले. समाजा समाजात तेढ निर्माण दहशत पसरवली. गेल्या ४ वर्षात कधीच दररोज पाणी दिले नाही. वर्षातून फक्त ६० ते ७० दिवस पाणी पुरवठा केला आणि ३६५ दिवसांची पाणी पट्टी वसुल केली.पाचव्या तलावाचा मोठा गाजावाजा केला पण अजूनही पाणी दररोज दिले नाही.उलट पाणी पुरवठा विभागाचा खर्च वाढला.
स्वच्छता विभातील कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार, शहरातील रस्ते व इतर अनेक विभागांत टक्केवारीसह अनेक प्रकारचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत कोल्हेंनी पालीकेचे मुख्याधिकारी सुहास जगताप व आमदार आशुतोष काळे यांच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका केली. तसेच आमदार काळे यांच्या निष्क्रीयते मुळे कोपरगाव मध्ये रस्ते,आरोग्य,कायदा सुव्यवस्था पाणी प्रश्नासह अनेक समस्या भेडसावत असताना दुसरीकडे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मुख्याधिकारी सुहास जगताप यांची बढती झाल्याने त्यांची त्वरीत बदली व्हायला पाहीजे माञ ते आजूनही येथेच खुर्चीला चिकटून का बसले आहेत. ते काहीतरी काळंबेरं कररीत दडवण्याची शक्यता असावी. सर्वच ठिकाणी भ्रष्टाचार होत असल्याची शंका कोल्हेंनी व्यक्त केली . ते पुढे म्हणाले की, कोपरगाव ची जनता सुज्ञ आहे यावेळी आमदार काळे यांना नाकारणार आहे. नागरीकांनी आता परिवर्तनासाठी सज्ज व्हावे. आम्ही स्थानिक पातळीवर मिञ पक्षांबरोबर आघाडी करुन जनतेच्या मनातले सुज्ञ व नवे चांगले चेहरे पालीकेत पाठवून जनतेच्या मनातला विकास करण्याचे अभिवचन देत आहोत असे सांगून कोल्हे यांनी नगरपालीका निवडणुकीचे रणशिंग काळे विरूद्ध फुंकले आहे. या निवडणुकीत ४५ ते ६० टक्के नवीन चेहऱ्यांना संधी देणार असुन सर्व समाजाच्या घटकातील लोकांना उमेदवारीची संधी देण्याची व्यवस्था केली आहे. असेही शेवटी म्हणाले.
दरम्यान काळे कोल्हे हे एकमेकांच्या विरोधात मोठ्या ताकतीने निवडणुकीत उतरणार असल्याने पालीकेची निवडणुक लक्षवेधी ठरणार आहे. आमदार काळे व विवेक कोल्हे यांच्या लढतीने कोणाला कुठे संधी मिळते याकडेही लक्ष लागले आहे