महाराष्ट्र राज्य हे कृषिप्रधान राज्य आहे आणि महाराष्ट्रातील बहुतांश नागरिकांचा शेती हा पारंपारिक व्यवसाय आहे त्यामुळे महाराष्ट्र शासन आपल्या राज्यातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी सतत प्रयत्नशील असते आणि त्यासाठी राज्य शासन शेतकऱ्यांसाठी वेळोवेळी विविध योजनांची सुरुवात करत असते.
आज आपण राज्य शासनाद्वारे राज्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सुरु करण्यात आलेल्या अशाच एका योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत ज्या योजनेचे नाव शेतकरी योजना आहे.
दिवसेंदिवस शेती क्षेत्राशी निगडी वस्तूंवर वाढणारी महागाई यामुळे शेतकऱ्यांना शेती उपयुक्त वस्तूंची खरेदी करणे शक्य होत नाही त्यामुळे त्यांना थोड्याफार प्रमाणात आर्थिक सहाय्य करण्याच्या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. शेतकरी योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना प्रतिवर्षी शासनाद्वारे 6,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य्य देण्यात येईल.
शेतकरी योजनेचा उद्देश
राज्यातील शेतकरी काबाड कष्ठ करून शेती करतात परंतु नैसर्गिक तसेच मानवनिर्मित आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते व त्यामुळे त्यांना याचा आर्थिक फटका बसतो व आधीच कर्जात बुडालेल्या आणि त्यात पिकांचे झालेले नुकसान व कुटुंबाला सांभाळण्याची जबाबदारी हे सर्व प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभे राहतात व या सर्व समस्यांचा त्रास सहन न झाल्यामुळे शेतकरी आत्महत्या करतात व घरातील कमावणारी व्यक्ती अशी एकाकी गेल्यामुळे त्याच्या कुटुंबाला उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण होतो त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी राज्य शासनाने शेतकरी योजना सुरु करण्याचा महत्वाचा असा निर्णय घेतला.
शेतकऱ्यांना संकटकाळात मदतीचा हाथ देणे तसेच त्यांना आर्थिक सहाय्य्य करणे हा शेतकरी योजनेचा मुख्य उद्देश आहे.
शेतकरी योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य करून राज्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे.
राज्यातील शेतकऱ्यांचा सामाजिक व आर्थिक विकास करणे.
संकटकाळात शेतकऱ्यांना पाठबळ देणे.
राज्यातील शेतकऱ्यांना शेती व्यवसायासाठी प्रोत्साहित करणे तसेच राज्यातील इतर नागरिकांना शेती व्यवसायाकडे आकर्षित करणे.
शेतकऱ्यांचे भविष्य उज्वल बनविणे.
शेतकऱ्यांना समाज प्रवाहात मानाचे स्थान निर्माण करून देणे.
संकट काळात राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याची भावना निर्माण करणे.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखणे हा शेतकरी योजनेचा एक मुख्य आणि महत्वाचा उद्देश आहे.
शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ करणे.
महाराष्ट्र शेतकरी योजनेचे वैशिष्ट्य
महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याच्या उद्देशाने तसेच त्यांना आर्थिक पाठबळ देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेली शेतकरी योजना एक महत्वाची अशी एक योजना आहे.
राज्यातील शेतकऱ्यांचे जीवमान सुधारण्यासाठी तसेच त्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनविण्यासाठी तसेच त्यांचा सामाजिक व आर्थिक विकास होण्यासाठी सदर योजना महत्वाची ठरणार आहे.
अर्ज करताना अर्जदारास कुठल्याच प्रकारचा सामना करावा लागू नये यासाठी अर्ज प्रक्रिया सोपी ठेवण्यात आली आहे.
या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया सोपी ठेवण्यात आली आहे त्यामुळे अर्जदार घरी बसून आपल्या मोबाईल तसेच कॉम्प्युटर च्या सहाय्याने अर्ज करू शकतो त्यामुळे त्याला कुठल्याच कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही व त्यामुळे अर्जदाराचा वेळ आणि पैसे दोघांची बचत होईल.
या योजनेअंतर्गत मिळणारी आर्थिक सहाय्याची राशी लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल त्यामुळे योजनेत घोटाळा होण्याची शक्यता नसेल.
शेतकऱ्यांच्या संकट काळात राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी असल्याची सकारात्मक भावना निर्माण होण्यास मदत होईल.
या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व जाती धर्माच्या शेतकऱ्यांना समाविष्ट करण्यात आले आहे.
शेतकरी योजना महाराष्ट्र चे फायदे
महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी त्यांना प्रतिवर्षी 6000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते.
या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या आर्थिक सहाय्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखल्या जातील.
राज्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारेल.
राज्यातील शेतकरी सशक्त व आत्मनिर्भर बनतील तसेच त्यांचा सामाजिक व आर्थिक विकास होईल.
या योजनेच्या सहाय्याने शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळेल.
राज्यातील शेतकरी स्वावलंबी बनतील व स्वतःच्या पायावर उभे राहतील.
शेतकऱ्यांच्या संकट काळात सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असल्याची भावना शेतकऱ्यांच्या मनात निर्माण होईल.
राज्यातील शेतकरी शेती व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहित होतील तसेच इतर नागरिक शेती व्यवसाय करण्यासाठी आकर्षित होतील.
शेतकऱ्यांना शेती कार्यासाठी लागणारी खते, कीटकनाशके व इतर सामग्री खरेदी करण्यासाठी पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही व कोणाकडून कर्ज घेण्याची सुद्धा गरज लागणार नाही.
शेतकऱ्यांचे भविष्य उज्वल बनेल.
शेतकऱ्यांना पाठबळ मिळेल.
शेतकरी योजनेसाठी आवश्यक पात्रता
अर्जदार शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
शेतकरी योजनेच्या अटी व शर्ती
फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकरीच शेतकरी योजनेसाठी पात्र आहेत.
महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
अर्जदार व्यक्ती हा शेतकरी असणे आवश्यक आहे.
अर्जदाराकडे कसण्यासाठी स्वतःची शेतजमीन असणे आवश्यक आहे.
अर्जदार शेतकरी आर्थिक दृष्ट्या गरीब असणे आवश्यक आहे.
अर्जदार अल्पभूधारक शेतकरी असणे आवश्यक आहे.
अर्जदार व्यक्तीचे स्वतःचे बँक खाते असणे आवश्यक आहे व बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक असणे आवश्यक आहे.
शेतकरी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
रेशन कार्ड
रहिवाशी दाखला
मोबाईल नंबर
ई-मेल आयडी
उत्पन्नाचा दाखला
बँक खात्याचा तपशील
जमिनीचे कागदपत्रे 7/12 व 8अ
पासपोर्ट आकाराचे फोटो
शपथपत्र
महाराष्ट्र शेतकरी योजनेअंतर्गत ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत
अर्जदार शेतकऱ्याला आपल्या जिल्हातील जिल्हा कार्यालयात कृषी विभागात जावे लागेल.
कृषी विभागामधून शेतकरी योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत योग्य ती कागदपत्रे जोडावी लागतील व अर्ज कृषी विभागातील कर्मचाऱ्यांजवळ जमा करावा लागेल.
अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
कृषी विभागातील कर्मचाऱ्यांकडून तुमच्या अर्जाची तसेच कागदपत्रांची तपासणी केली जाईल व तुम्ही पात्र असल्यास तुम्हाला या योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य सुरु करण्यात येईल.
शेतकरी योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत
शेतकरी योजनेंतर्गत अर्ज करू इच्छिणाऱ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण सध्या महाराष्ट्र सरकारने कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत ही योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या योजनेची अर्ज प्रक्रिया सुरु करे पर्यंत तुम्हाला काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे सरकार जशी अर्ज प्रक्रिया सुरु करेल त्याची संपूर्ण माहीत माहीत आम्ही या आर्टिकल मध्य अपडेट करू त्यामुळे आमची तुम्हाला विनंती आहे कि काही वेळाने या आर्टिकल ला भेट देत रहा.