Logo
सरकारी योजना

तारबंदी योजना महाराष्ट्र 2023

आज आपण या लेखामध्ये तारबंदी योजना महाराष्ट्र 2023 संबंधित संपूर्ण माहिती पाहणार आहोत. काय आहे ही योजना, त्यासाठी शेतकऱ्यांना किती अनुदान मिळणार, त्या संबंधीच्या सर्व गोष्टी जसे कागदपत्रे, अर्ज कसा करावा इत्यादी माहिती तुम्हाला आज या लेखांमध्ये मिळणार आहे. त्यासाठी हा लेख संपूर्ण नक्की वाचा. केंद्र आणि राज्य सरकारने वेळोवेळी शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांपैकी तारबंदी योजना ही अशीच एक शेतकऱ्यांच्या हिताची योजना आहे. ही योजना सरकारने तारबंदी योजना नावाने सुरू केली आहे. या योजनेचा लाभ देशातील शेतकऱ्यांना त्यामध्ये अल्पभूधारक आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना घेता येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाणार आहे. या योजनेच्या मदतीने शेतकरी इतर भटक्‍या जनावरांपासून आपल्या पिकाचे संरक्षण करू शकेल. म्हणून ही योजना नव्याने सुरू करण्यात आलेली आहे. योजनेचे उद्दिष्ट्य काय? भटक्या जनावरांपासून शेतकऱ्यांच्या पिकाचे संरक्षण करणे हेच या योजनेचे मुख्य उद्दिष्ट असणार आहे. अशा परिस्थितीमध्ये भटक्या जनावरे त्यांच्या शेतातील पिके नष्ट करून पिकांची नासधूस करून शेतकऱ्याचे नुकसान करतात आणि ही भीती सर्वच शेतकरी वर्गामध्ये दिसून येते. ही समस्या लक्षात घेऊन सरकारने शेतकऱ्यांना त्यांच्या शेताच्या कडेने कुंपण घालण्यासाठी 40 ते 50 हजार रुपयांची आर्थिक मदत या योजनेमार्फत करणार आहे. तारबंदी योजनेसाठी अनुदान किती? योजनेसाठी शेतकऱ्यांना चाळीस हजार रुपयांची मदत सरकारकडून दिली जाणार आहे. या योजनेअंतर्गत 50 टक्के अनुदान शासनाकडून दिले जाणार असून 50 टक्के अनुदान 50 टक्के खर्च हा स्वतः शेतकर्‍याला करावा लागेल. या योजनेतून मिळणारी रक्कम ही थेट शेतकरी लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये पाठवली जाईल. या योजनेचा लाभ मिळवू इच्छिणाऱ्या शेतकरी अर्जदाराला त्याच्या मोबाईल द्वारे ऑनलाइन अधिकृत संकेत स्थळाला भेट देऊन या योजनेचा अर्ज भरावा लागेल आणि लाभ मिळवावा लागेल. तारबंदी योजना महाराष्ट्र योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो? त्यासाठी आवश्यक पात्रता काय? ज्या शेतकऱ्याकडे लागवडीसाठी 0.5 एकर जमिन आहे, त्या शेतकऱ्याला या योजनेचा लाभ घेता येईल. 400 मीटर ची तारबंद झाल्यानंतरच शेतकऱ्याला अनुदान दिले जाईल. या योजनेचा लाभ देशातील सर्व अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना घेता येणार आहे. अर्ज करण्यासाठी शेतकऱ्याचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे. तारबंदी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे (Documents)कोणती? इच्छुक आणि पात्र शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी खालील कागदपत्रांची आवश्यकता असेल. अर्जदाराचे मतदान कार्ड रहिवासी प्रमाणपत्र मोबाईल नंबर पासपोर्ट आकाराचा फोटो रेशन कार्ड जमिनीची जमाबंदी अर्ज कोठे करावा? तारबंदी योजनेअंतर्गत जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर, त्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या सार्वजनिक सेवा केंद्र म्हणजेच सीएससी केंद्रात जावे लागेल. अर्जदार कृषी विभागाच्या अधिकृत संकेत स्थळाला भेट देऊन देखील अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतील. त्यानंतर तुम्हाला तारबंदी योजनेचा फॉर्म भरण्यासाठी आवश्यक ती सर्व कागदपत्र तुमच्या एजंट ला द्यावी लागतील. त्या एजंट ने विचारलेली सर्व माहिती आणि आवश्यक ती कागदपत्रे अपलोड केली जातील. अर्ज भरल्यानंतर शेवटी तुम्हाला अर्जाची पावती दिली जाईल. यानंतर कार्यालयात तुमचा अर्ज आणि सर्व कागदपत्रांची पडताळणी अधिकाऱ्यांमार्फत पूर्ण केली जाईल. अर्ज पूर्ण पडताळणी झाल्यानंतर अर्जदाराला एसएमएसद्वारे कळवली जाईल. त्यानंतर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल.